Sunday, August 19, 2018

व्वा रे सोशल मिडिया कहरच केला की ...

व्वा रे सोशल मिडिया कहरच केला की ...
डॉ .जावेद तांबोळी , 
 श्री .संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा .


सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत एक आभासी जग आपल्या भोवती सतत असतं ते म्हणजे सोशल मीडिया , वास्तविक किती अन खोटं किती यांचा कसलाही विचार न करता आलेली पोस्ट शंभर ग्रुप वरती फॉरवर्ड काही लोक करत राहतात ,(त्यांना आपण  सोशिक म्हणूयात )त्यांचे नेमके काय परिणाम होतील याचं जराही विचार ही लोक करत नाहीत , आली पोस्ट की मार रट्टा हीच यांची खासियत , अफवेचे पीक किती जोमात वाढेल याची काही खात्री नाही ,  वेगवेगळ्या अफवा भुताटकी पासून देवाला सुद्धा हे शोषिक सोडत नाहीत.  कधी कधी वाटतं पूर्वीचा  टेलिफोन लाख पटीने बरा होता गरजेपुरते बोलणं होतं ,गल्लीत एखादा टेलिफोन असला तरी माणुसकीने फोन येणाऱ्या व्यक्तीला बोलवलं जायचं आणि लांब असलेली नात्याला अधीक घट्ट बनवलं जायचं .आज सर्वांच्या सोयीसाठी जरी प्रत्येकाजवळ  मोबाइल तरी  मदत करण्यापेक्षा  अडचणीतल्या लोकांचे व्हिडीओ काढण्यात हे नवीन शोषिक व्यस्त असताना दिसतात . नेमकं काय चित्रीकरण करावं ,कुठले फोटो टाकावेत याचं लोकजागृती करण्याची खरंच वेळ आलेली दिसते ,आपण शोषल मीडियाचा वापर कसा आणि किती करावा याचीही लोकजागृती होणें गरजेचं आता वाटू लागलिय .नुकताच जो अमानुष प्रकार धुळे जिल्ह्यात झाला त्यानें तर कोर्याची सीमाच गाठली .पोट भरण्यासाठी  बाहेर पडलेल्या , पारंपरिक व्यवसाय अथवा रोजगारच्या  शोधात बऱ्याच भारतीयांना एका ठिकणा हुन दुसऱ्या ठिकाणी फिरावे लागते परंतु शोषिकामुळे त्यांनीं पसरवलेल्या अफवामुळे आता पारंपरिक व्यवसाय करणे ही मुश्किल झाले आहे .. एक सुजाण नागरिक  म्हणून आपली काय जबाबदारी हवी हे जरी या शोषिकांना कळलं तरी ठीक नाही तर आणखी किती जणांचा बळी जाईल याची काही खात्री नाही .सोशल  मीडियाचे फायदे खुप आहेत आणि ते वापर करण्याऱ्या वर अवलंबुन आहेत ...नाहीतर चाललंय आपलं आली पोस्ट की मार रट्टा. 

No comments:

Post a Comment

श्री.संत दामाजी महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तिहेरी सूवर्ण पदक

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत श्री....